नागपूरच्या ग्रामीण भागात साकारतेय डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मृतीसंग्रहालय
एकता दर्शन : चिचोली, नागपूर येथील स्वर्गीय गोपिकाबाई बाजीराव ठाकरे यांनी १९५७ रोजी धम्म कार्यासाठी दान केलेल्या साडेअकरा एकर जागेत कोट्यावधी रुपये खर्चातून भव्य असा डॉ.बाबासाहेब आंबेडकर शांतीवन प्रकल्प (स्मृतीसंग्रहालय) साकारत असून बाबासाहेबांच्या स्मृती संवर्धनासाठी हा प्रकल्प मोठ्या प्रमाणावर विकसित करण्याचे काम सुरू आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथील दीक्षाभूमीवर लाखो अनुयायींच्या उपस्थितीत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. यापूर्वी एक वर्ष अगोदर (जानेवारी १९५५) डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये असे म्हटले होते की, बौध्द धर्माचा स्वीकार केल्यानंतर बौध्द धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी "धम्म प्रचारक प्रशिक्षण विद्यालयाची" आपण निर्मिती करणार आहोत. बाबासाहेबांचं हेच स्वप्न पूर्ण होण्यासाठी १९५७ मध्ये स्वर्गीय गोपिकाबाई बाजीराव ठाकरे यांनी नागपूरच्या चिचोली गावातील आपल्या मालकीची ११.३६ एकर जमीन दान केली होती.
डॉ.बाबासाहेबांच्या निकट असणारे तत्कालीन अनुयायी धम्मसेनानी वामनराव गोडबोले यांनी गोपिकाबाई ठाकरेंनी दान केलेली साडेअकरा एकर जमीन १९८५ सालानंतर विकसित करण्यास सुरूवात केली. वामनराव गोडबोले हे डाॅ.बाबासाहेबांच्या बौद्ध धम्म दीक्षा सोहळ्यातील प्रमुख सहभागी होते, त्यांनी बाबासाहेबांच्या बौद्ध धम्म दीक्षा सोहळ्याचा सुवर्ण इतिहासही लिहून ठेवला आहे.

प्रकल्पात विविध विभागांचा समावेश :
नागपूर शहरापासून १५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या चिचोली गावात गोपिकाबाई ठाकरे यांनी दान केलेल्या जागेत आज भव्य असा "डॉ.बाबासाहेब आंबेडकर शांतीवन प्रकल्प" साकारत असल्याचे चित्र दिसत असून या जागेवर स्तुप, बुद्ध विहार, गेस्ट हाऊस, ऑडिटोरियम, न्यू मेमोरियल (नवीन स्मृतीसंग्रहालय), रिसर्च सेंटर, धम्म प्रचारक प्रशिक्षण विद्यालय यासह अन्य मोठी बांधकामे सुरू आहेत.
डॉ.बाबासाहेबांच्या वापरातील महत्त्वाच्या वस्तूंचा संग्रह :
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिंसह बाबासाहेबांनी वापरलेल्या जवळपास ३०० पेक्षा जास्त वस्तू या ठिकाणी उपलब्ध आहेत, यामध्ये बौद्ध धर्माची दीक्षा घेतली तेव्हाची बुद्धमुर्ती, भारतीय संविधानाची पहिली प्रत टाईप केलेला टाईप रायटर, बाबासाहेबांची विविध प्रकारची कपडे, खुर्ची, बाबासाहेबांनी रेखाटलेले बुद्धांचे चित्र आदी मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वीय सहाय्यक नानकचंद रत्तू यांनी जतन केलेल्या बाबासाहेबांच्या अनेक वस्तूंचाही या ठिकाणी समावेश करण्यात आला आहे. १९९० सालानंतर नानकचंद रत्तू यांनी त्यांच्याकडील असणाऱ्या बाबासाहेबांच्या अनेक वस्तू वामनराव गोडबोले यांनी विकसित केलेल्या शांतीवन स्मृतीसंग्रहालयासाठी दिल्या.
Sponsored
संबंधित बातम्या
लेखणी, वाणी आणि कृतीचा दुर्मीळ संगम : प्रा. रमेश आढाव
ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, लेखक आणि सामाजिक चळवळीतील धडाडीचे कार्यकर्ते प्रा. रमेश तुकाराम आढाव यांची १ ऑगस्ट रोजी साजरी होणारी जयंती म्हणजे त्यांच्या कार्याचा, विचारांचा आणि समाजासाठी...
लेखणीतून सामाजिक बदलाची ताकद दिसली पाहिजे : प्रा.विकास शिंदे
एकता दर्शन (फलटण) : पत्रकारिता क्षेत्रात येणार्या नव्या पिढीतील पत्रकारांचा अभ्यास प्रगल्भ असणे आवश्यक आहे. आपल्या परिसराची ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक पार्श्वभूमी यांची सखोल...
डॉ.वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कार जाहीर : ३१ मार्च २०२६ रोजी होणार सन्मान
एकता दर्शन (फलटण) : शिक्षण क्षेत्रातील प्रतिथयश व्यक्तिमत्त्व डॉ.वैशाली विजय शिंदे यांची भारत गौरव रत्न श्री सन्मान कौन्सिल (भारत सरकारमान्य संस्था) यांच्यावतीने दिल्या जाणाऱ्या...
पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन
एकता दर्शन (फलटण) : आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. या ऐतिहासिक घटनेच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी ६ जानेवारी हा दिवस...
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचा उपक्रम
एकता दर्शन (फलटण) : श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग असलेल्या (आळंदी-पुणे-पंढरपूर-मोहोळ राष्ट्रीय महामार्ग) सातारा-सोलापूर जिल्हा सरहद्दीवरील साधूबुवा ओढ्यानजिक पुणे...
