भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या एकदिवसीय सामन्यात विविध विक्रमांची नोंद
ओव्हल (लंडन) : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरवात झाली. ओव्हल (लंडन) येथे पार पडलेल्या पहिल्याच सामन्यात भारताने १० विकेट्स घेऊन इंग्लंडचा दारुण पराभव केला. दरम्यान या दोन्ही देशांच्या झालेल्या सामन्यात विविध विक्रम पाहायला मिळाले.
कर्णधार रोहित शर्माने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरीच्या जोरावर इंग्लंडच्या संघाला ११० धावांवरच रोखले. भारताला विजयासाठी १११ धावांची गरज असताना रोहित शर्मा व शिखर धवन जोडी सलामीला उतरली.
रोहित शर्मा व शिखर धवन जोडीच्या ५००० धावा पूर्ण :
कर्णधार रोहितने या सामन्यात ५८ चेंडूत ७८ धाव केल्या व शिखरने ५४ चेंडूत ३१ धावा करून भारताला विजय मिळवून देण्याबरोबरच या डायनॅमिक जोडीने मिळून ५००० धावांचा टप्पा पूर्ण केला. रोहित शर्मा आणि शिखर धवन हे सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली या दिग्गज जोडीनंतर ५००० धावांचा टप्पा पूर्ण करण्याची कामगिरी करणारी दुसरी भारतीय जोडी ठरली.
बुमराहची क्रिकेटच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी :
भारत आणि इंग्लंड यांच्यातील खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात बुमराहने त्याच्या क्रिकेटच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली. त्याने ७.२ षटकात १९ धावा देत ६ विकेट्स घेतल्या. यावेळी २.५९ हा इकॉनॉमी रेट होता. जसप्रीत बुमराहच्या या कामगिरीमुळे त्याच्या ओडीआय कारकिर्दीतील तो दुसरा फिफर ठरला.
सर्वात जलद १५० विकेट घेणारा मोहम्मद शमी :
भारत आणि इंग्लंड यांच्यातील खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमीने ३ विकेट्स घेतल्याने भारताला विजय मिळवून देण्यात त्याचा मोलाचा वाटा ठरला. शमीने या सामन्यात ३ विकेट्स घेऊन त्याच्या क्रिकेटच्या कारकिर्दीतील १५० एकदिवसीय विकेट पूर्ण केल्या, तसेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये मोहम्मद शमी हा सर्वात जलद १५० विकेट घेणारा खेळाडू ठरला.
शिखर धवनचा १५०वा एकदिवसीय सामना :
इंग्लंडने १११ धावांचे आव्हान दिल्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्मा व शिखर धवन हे दोघे सलामीला मैदानात उतरले. शिखर धवन त्याच्या कारकिर्दीतला १५०वा एकदिवसीय सामना खेळण्यासाठी मैदानावर जात असताना उपस्थित अनेकांनी त्याचे अभिनंदन केले. शिखरने या सामन्यात ५४ चेंडूत ३१ धावा केल्या.
दरम्यान या सामन्यात भारताने विजय मिळवल्याने आयसीसी ओडीआय क्रमवारीत भारत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. न्यूझीलंड १२७ गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे, दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंड (१२२) आहे. भारत (१०८) तिसऱ्या क्रमांकावर आहे.
Sponsored
संबंधित बातम्या
फलटणची मिताली जिल्हास्तरीय बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत अव्वल
जिल्हास्तरीय बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत निंभोरे (ता.फलटण) येथील कु.मिताली अनिल महामुनी या विद्यार्थिनीने १३ वर्षीय गटात विजेतेपद पटकविले असून तालुक्यातील क्रीडाक्षेत्रात तिचे...
गुजरात विरुद्ध चेन्नई ; दोन्ही संघ विजेतेपदासाठी लढणार
एकता दर्शन: जगातील सर्वात मोठी समजली जाणारी क्रिकेट लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग जवळपास ५८ दिवसांपासून सुरू असून आज या हंगामातील अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर...
आजपासून रंगणार IPLचा थरार
एकता दर्शन : जगातील सर्वात मोठी समजली जाणारी क्रिकेट लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीगचा १६ वा हंगाम विविध क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत आजपासून सुरू होत आहे. यावर्षी १० संघांमध्ये...
फलटणमध्ये राष्ट्रीय खो-खो स्पर्धेची जय्यत तयारी
फलटण (एकता दर्शन) : दिनांक २८ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान फलटण येथे ३२ वी राष्ट्रीय किशोर / किशोरी खो-खो स्पर्धा होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर फलटण मधील विविध संस्थांच्या सहभागातून या...
इंडिजला हरवून भारताचा मालिकेवर कब्जा ; अक्षर पटेल विजयाचा हिरो
एकता दर्शन : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतने इंडिजवर विजय मिळवत मालिकेत २-० अशी आघाडी घेतली.
