चंद्रकांत अहिवळे फलटणच्या सामाजिक चळवळीतील पँथर : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
फलटण (एकता दर्शन) : दलित पँथर चळवळीतून स्वर्गीय चंद्रकांत अहिवळे यांनी जय भीमाचा नारा बुलंद करून तालुक्यातील अन्याय अत्याचाराला चोख प्रतिउत्तर देत पँथर सक्षम केल्यामुळेच मला राजकीय ताकद मिळाली. फलटणच्या राजकीय ताकदीमुळेच राजकारणातील सत्तेच्या संधी मिळाल्या असल्याचे सांगत फलटणने राजकीय ताकद दिली नसती, तर माझी देशभर ओळख झाली नसती. असे भावुक उद्गार केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काढले.
येथील पँथर चंद्रकांत अहिवळे यांचे नुकतेच निधन झाले, त्या पार्श्वभूमीवर फलटण रिपाईच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन परिसरात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी ना. आठवले बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री राजाभाऊ सरोदे, रिपाईचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. शहाजी बापू कांबळे, अण्णा वायदंडे, सुनिल सर्वगोड, ॲड. विजय गव्हाळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुभाष शिंदे, भाजपाचे फलटण तालुकाध्यक्ष पै. बजरंग गावडे आदी उपस्थित होते.
पँथरच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची चळवळ फलटणसह अन्य राज्यात उभी करण्याचे काम त्याकाळी तरूण वर्ग करत होता, आज रिपाईच्या माध्यमातून आम्ही करत आहे. सतत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेवुन सामाजिक, राजकीय चळवळ केल्यामुळेच आम्हाला राज्य आणि केंद्रातील सत्तेची संधी मिळाली. या सत्तेच्या माध्यमातूनच सर्वसामान्यांचे काम होत आहे. विविध शासकीय योजना कार्यान्वित केल्या जात आहेत. त्यामुळे सामान्यांच्या विकासाला चालना मिळत असल्याचे ना. आठवले यांनी यावेळी स्पष्ट केले.

पँथर चंद्रकांत अहिवळे प्रशासकीय सेवेत असतानासुद्धा ते माझ्या संपर्कात असायचे. त्यांनी अखेरपर्यंत मला सल्ला दिला, प्रेम दिलं. त्यांचा आदर्श घेवुन पुढील पिढीने समाजाचे काम करावे. बाबासाहेबांचा विचार पुढे न्यावा. सर्व-धर्म-समभाव अशी शिकवण देणाऱ्या भावनांची कदर करणारी भारतीय संस्कृती जोपासावी असे आवाहनही ना.आठवले यांनी केले.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय अहिवळे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सुभाष शिंदे, राजा सरोदे, सुनिल सर्वगोड, अण्णा वायदंडे, विजय गव्हाळे, बजरंग गावडे, शहाजी कांबळे आदींनी आपले श्रद्धांजलीपर विचार व्यक्त केले. प्रास्ताविक विजय येवले यांनी केले. सुत्रसंचलन संजय निकाळजे यांनी केले. शोकसभेस सामाजिक, राजकीय क्षेत्रातील, व चळवळीतील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्मेने उपस्थित होते.
Sponsored
संबंधित बातम्या
साताऱ्यात रंगणार सरस्वतांचा सोहळा ! ९९व्या मराठी साहित्य संमेलनाची 'ग्रंथदिंडी' ठरणार ऐतिहासिक
एकता दर्शन (सातारा) : ऐतिहासिक सातारा नगरीत होणाऱ्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे काऊंटडाऊन सुरू झाले असून, या महासोहळ्यातील ग्रंथदिंडी व भव्य शोभायात्रा हे प्रमुख आकर्षण...
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा
एकता दर्शन (पोंभुर्ले, ता. देवगड) मराठी वृत्तपत्रसृष्टीत सलग ३४ वर्षे पत्रकारिता करणारे आणि त्यानंतर पुणे पत्रकार प्रतिष्ठान, पुणे विद्यापीठाच्या रानडे इन्स्टिट्यूट मध्ये कार्यरत...
महाराष्ट्रातील मतमोजणी २१ डिसेंबरलाच ; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
एकता दर्शन (फलटण) : राज्यात विविध ठिकाणी नगरपालिका व नगरपंचायतच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत, त्यांची मतमोजणी २१ डिसेंबर रोजीच करण्यात यावी, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे....
संत नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारी उत्साहात
एकता दर्शन (फलटण) : संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने श्री क्षेत्र पंढरपूर (महाराष्ट्र) ते श्री क्षेत्र घुमाण (पंजाब) सुमारे ५ हजार किलोमीटर लांब असणारी व ३१ दिवस...
दि.6 जानेवारी रोजी पोंभुर्ले येथे 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण
फलटण : ‘महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी’तर्फे देण्यात येणार्या राज्यपातळीवरील प्रतिष्ठित 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री ना.नितेश...
