फलटणमध्ये जैन समाजाचा विशाल मोर्चा
एकता दर्शन (फलटण) : झारखंड राज्य सरकारने जैन समाजाचे असलेले "श्री सम्मेद शिखरजी" हे तीर्थक्षेत्र पर्यटनस्थळ म्हणून घोषित केल्याच्या निर्णयाला विरोध दर्शविण्यासाठी जैन समाजाच्यावतीने देशात भारत बंदची हाक देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर फलटण शहर व तालुक्यातील जैन समाजाच्यावतीने आज दि. २१ रोजी सकाळी १०:०० वाजता फलटण बंदची हाक देत येथील प्रांत कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला होता. दरम्यान फलटण बंदच्या आवाहनाला आणि निषेध मोर्चाला विविध जाती धर्म पंथीय व राजकीय पक्षांनी पाठींबा देऊन झारखंड राज्य शासनाच्या कृतीचा जोरदार निषेध व्यक्त केला. यावेळी मोर्चेकरांच्या वतीने प्रांत अधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांना निवेदन देण्यात आले.
झारखंडमधील गिरिडीह जिल्ह्यात जैन धर्मियांचे "श्री सम्मेद शिखरजी" हे तीर्थस्थळ आहे. या तीर्थस्थळाला झारखंड राज्य सरकारने पर्यटनस्थळ म्हणून घोषित केले आहे. या घोषित निर्णयाला जैन समाजाचा तीव्र विरोध आहे. श्री सम्मेद शिखरजी हे ठिकाण पर्यटनस्थळ झाल्यास धार्मिक पावित्र्य जपले जाणार नसून जैन धर्माच्या संस्कृतीत न बसणारा हा निर्णय आहे. झारखंड राज्य सरकारने तेथील सर्व धार्मिक स्थळं हि पवित्र स्थळं म्हणून घोषित करून मद्य, मांसाहार, व अन्य व्यसनांवर बंदी आणावी. श्री सम्मेद शिखरजी स्थळाला पर्यटनस्थळ म्हणून घोषित केल्याचा निर्णय जैन धर्माच्या भावना दुखावणारा असून झारखंड राज्य सरकारने तो मागे घ्यावा असे प्रांत अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे.

मोर्चाची सुरूवात येथील जैन स्तंभापासून करण्यात आली. त्यानंतर मोर्चा डेक्कन चौक, महात्मा फुले चौक ते अधिकार गृहासमोरील श्रीमंत मालोजीराजे यांच्या पुतळ्याजवळील परिसरात आला. यावेळी विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या मोर्चाला आपला पाठिंबा दिला. दरम्यान, माजी नगरसेवक अनुप शहा यांनी मोर्चेकऱ्यांना मार्गदर्शन केले. भाजपचे जयकुमार शिंदे, अशोक जाधव, सचिन अहिवळे, अमोल सस्ते, काँग्रेसचे अमीरभाई शेख, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक यशवंत खलाटे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ) या सर्वांनी जैन समाज बांधवांच्या मोर्चाला पाठिंबा व्यक्त केला.
या मोर्चात डॉ. सूर्यकांत दोशी, डॉ. महेंद्र गांधी, रमणशेठ दोशी, डॉ. व्होरा, मंगेशशेठ दोशी, निलेश दोशी, अनुप वडुजकर, यशराज गांधी, भरतदेश दोशी, जिनेश दोशी, संकेत गांधी, शुभम दोशी, सुमित दोशी, सागर दोशी, संजीत दोशी यांच्यासह जैन समाजातील महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Sponsored
संबंधित बातम्या
लेखणी, वाणी आणि कृतीचा दुर्मीळ संगम : प्रा. रमेश आढाव
ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, लेखक आणि सामाजिक चळवळीतील धडाडीचे कार्यकर्ते प्रा. रमेश तुकाराम आढाव यांची १ ऑगस्ट रोजी साजरी होणारी जयंती म्हणजे त्यांच्या कार्याचा, विचारांचा आणि समाजासाठी...
लेखणीतून सामाजिक बदलाची ताकद दिसली पाहिजे : प्रा.विकास शिंदे
एकता दर्शन (फलटण) : पत्रकारिता क्षेत्रात येणार्या नव्या पिढीतील पत्रकारांचा अभ्यास प्रगल्भ असणे आवश्यक आहे. आपल्या परिसराची ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक पार्श्वभूमी यांची सखोल...
डॉ.वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कार जाहीर : ३१ मार्च २०२६ रोजी होणार सन्मान
एकता दर्शन (फलटण) : शिक्षण क्षेत्रातील प्रतिथयश व्यक्तिमत्त्व डॉ.वैशाली विजय शिंदे यांची भारत गौरव रत्न श्री सन्मान कौन्सिल (भारत सरकारमान्य संस्था) यांच्यावतीने दिल्या जाणाऱ्या...
पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन
एकता दर्शन (फलटण) : आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. या ऐतिहासिक घटनेच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी ६ जानेवारी हा दिवस...
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचा उपक्रम
एकता दर्शन (फलटण) : श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग असलेल्या (आळंदी-पुणे-पंढरपूर-मोहोळ राष्ट्रीय महामार्ग) सातारा-सोलापूर जिल्हा सरहद्दीवरील साधूबुवा ओढ्यानजिक पुणे...
